Sunday, May 10, 2009

वादळ...

वादळाने, कधी असते, यायचे
हे का, आम्ही असते, ठरवायचे...?

सलगी करु, म्हणतो वादळाशी
ऐकता, ते नेमके, बहकायचे...

वादळाला, जाणताना, त्रास होतो
का तरी, काळीज, त्याचे व्हायचे...?

वादळाची, ओढ होती, अंतरीला
श्वास तेथे, खेचुनी, मज न्यायचे...

उब नाही, मिठीमध्ये, वादळाच्या
का तरी, काळीज, वेडे व्हायचे...?

पुरवितो, स्वप्न एका, वादळाचे
त्यास, घेवुन साथ, पायी जायचे...!

वादळाशी, जिंकणे, होते कधी का...?
स्वप्न आहे, वादळा, हरवायचे...!

कवी - महेश घाटपांडे

जेव्हा...

चांदण्याने हात, जाळले जेव्हा
तू मला नेमके, टाळले तेव्हा...

मोगरा नेमका, बेभान झाला
तयाला वेचले, माळले जेव्हा...

सोडले मनाच्या, मी बंधनांना
तू मला बोलली, भाळले जेव्हा...

वाचले डोळ्यात, कोवळे धागे
तू मला एकदा, चाळले जेव्हा...

परतुन आला, श्रावण माझा
कायदे भेटीचे, पाळले जेव्हा...

कवी - महेश घाटपांडे

जगावयाला...

आम्हालाही, शिकवा थोडे, जगावयाला
भुलभुलैया वाली दुनिया, बघावयाला...

घुसमटलो, मी कामामध्ये, वर्षे-वर्षे
मोकळीक द्या, श्वासांनाही, तगावयाला...

पटावरती, बसलो आणि, खिसे मोकळे
दोन आसवें, उरली हाती, लगावयाला...

सरणाशी मी, जग सारे ही, मुठीत होते
मिळायचे ते, नाही लाभले, योग्य वयाला...

कवी - महेश घाटपांडे

माळून गेलो...

दुसरे काही, जरी येथले, टाळून गेलो
तुझा मोगरा, मनात माझ्या, माळून गेलो...

हातावरले, दुःख पाहुनी, कोणी रडले
तळहाताला, मीच स्वतःच्या, जाळून गेलो...

श्रावण होता, नयनी माझ्या, कधी काळचा
तुझाच खांदा, बघुनी थोडा, गाळून गेलो...

तसा कोरडा, शुष्क म्हणोनी, जगलो होतो
कसे कळेना, तुझ्या अंतरी, भाळून गेलो...

दिल्या घेतल्या, दोघांनी बघ, काही शपथा
मीच एकटा, का बरे त्या, पाळून गेलो...?

मुष्कील आहे, तुला वाचणे, जाणून होतो
संदर्भांची, चारच पाने, चाळून गेलो...

गझलकार - महेश घाटपांडे

Saturday, May 2, 2009

निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल

आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.



आता येईल फोन तिचा ’बोलत का नाहीस?

एसेमेसला माझ्या उत्तर पाठवत का नाहीस?

तुझं गाणं तुझे शब्द वेडं करतात मला!

झालं गेलं विसर आणि सोड ना अबोला!’

काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल

आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.



तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिची बडबड

तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड

मीही तिच्यात गुंतलो होतो आता कळ्तं मला

तिचं नसणं कण कण जाळत असतं मला

तिलासुध्दा तिथे आता हाच विचार स्मरत असेल

आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.



अन एकाएकी लागेल उचकी येईल तिचा फोन

मी सुध्दा हलो म्हणेन विसरून माझं मौन

तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले

’का रे छळ्तोस असा माझे श्वास थांबलेले’

दोघांमधलं अंतर आता वार्यासारखं सरत असेल

आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर
वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत :ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुन गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची............ ........


श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची ............ ........


चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची............ ........


आता सगळं संपलय ,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची............ ........


पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या वाटही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची ............
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं....!
तुझ्या एका नकाराने
गारा वितळतात म्हणुन त्या
वेचायाचे कोणी सोडित नाही
तुझ्या एका नकाराने
नाते काही मी तोडित नाही
काही ही म्हण तू
पण शब्दानी प्रेम आसे तुटत नाही
नाही भेटलो पुन्हा तरी
न भेटल्याने ह्रुदयातील प्रेम आटत नाही
कळतय मला तुला आज
मझ्यापद्दल काही वाटत नाही
पण लक्ष्यात ठेव
दाबल्याने प्रेम कधी दबत नाही
तू फक्त हसत रहा
दुसर काही ही मी मागत नाही
मेरे नाम के साथ उसका न नाम लीया जाए...
क्यू उस सादादिल को यु बदनाम किया जाए......

खरोच उसके जिस्म पर.....दर्द मेरे सिने में..
सोचता हु ऐसे निस्बत को क्या नाम दिया जाए...

न उसका तसव्वुर है..न याद..न आखो में नमी..
चलो आज की शाम जरा आराम किया जाए....

वो अगर रूबरू हो...और निगाहों में हो निगाह....
फीर क्यू..... मुद्दत्तो तक कोई जाम पिया जाए....

फीर वही शेरो-ओ-सुखन ..फीर उसी का जिक्र ''बादल''
अरे छोडो भी मिया ..अब कुछ काम किया जाए..!!

चुपके-चुपके रात-दिन'चा असाही एक भावानुवाद

मूक अश्रू, ढाळणे, दिनरात ते- स्मरते मला
प्रेमवेड्या भावनांचे, पर्व ते- स्मरते मला
खेचता, अवचित मी पडदा तुझे ते लाजुनी,
ओढणीने चेहऱ्याला झाकणे-स्मरते मला.
तुजसी मी बोलाविता, मज भेटण्या, येणे तुझे,
भर दुपारी, तेही अनवाणीच गे-स्मरते मला
विषय विरहाचा, कधी निघताच, रात्री भेटीच्या,
ते तुझे रडुनी, मलाही रडविणे-स्मरते मला.
लपुनी तु भेटायची, मजला सखे गे, ज्या स्थळी,
उलटली वर्षे परंतु, स्थान ते-स्मरता मला.